अहमदनगर दि.६ ऑक्टोबर
गाडी फायनान्स वर घेतली मात्र त्याचे हप्ते वेळेवर न फेडल्याने गाडीच्या किमतीपेक्षा फायनान्सच्या कर्जाची रक्कम दुप्पट झाल्याने औरंगाबाद मधील एका पठयाने चांगलीच शक्कल लढवली होती. मात्र पोलिसांच्या चणाक्षबुद्धीने पुन्हा एकदा दाखवून दिले की कानून के हात लंबे होते है ! अखेर पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करून या कथीत गुन्ह्याची उकल केली आहे.
याबाबत माहिती अशी की नेवासा पोलीस स्टेशन मध्ये 3 ऑक्टोबर रोजी सुनिल खिराडकर यांनी फिर्यादी दिली होती की दोन ऑक्टोबर रोजी लासूर स्टेशन येथून १० टन ६०० किलो गव्हाच्या बॅग भरुन अहमदनगरकडे जात असतांना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास खडका फाटा ते नेवासा फाटा रोडवर टोलनाक्याच्या आसपास पुढे ०३ अज्ञात इसमांनी आम्ही फायनान्स कंपनीचे लोक आहोत असे सांगुन मला गाडीचे खाली उतरुन लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ करुन माझे ताब्यातील लेलंड आयशर कंपनीची गाडी एम.एच.२० ई.जी. ८१६१ व त्यामधील १० टन ६०० कि. गहु असा एकुण १४,८८,८६४/- रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन घेऊन नेला अशी फिर्याद नोंदवली होती. हा मोठा गंभीर गुन्हा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्याबाबत समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि त्यांच्या पथकाने याप्रकरणी औरंगाबाद पासून ज्या ठिकाणी गाडी फायनान्स कंपनीच्या लोकांनी ओढून गेली या मार्गावर वरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली तसेच या प्रकरणातील फिर्यादी याची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सत्य काहीतरी वेगळेच असल्याचे समोर आलेय.
आयशर टेम्पोचे फायनान्सची रक्कम टेम्पोच्या किमतीपेक्षा जास्त झाली होती व टेम्पोमालकाकडे फायनान्सची रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चोरीचा बनाव करून गाडीचा चालक सुनील खिराडकर याने टेम्पो मालक बाबासाहेब बबन हिरे यांचे सांगण्यावरुन आयशर टेम्पो हा गव्हासह कृष्णराज पेट्रोलियम प्रा.लि. पानपोई फाटा. वनद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे लावून चोरीचा बनाव करुन नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती असे सांगितलं.पोलिसांनी गुन्हयातील आयशर टेमो १२,००,०००/- रुपये व त्यामधील गव्हाच्या २०२ बॅग किं.रुपये २.८८.८६४ / असा एकूण १४.८८.८६४/- औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वनद्रा येथून हस्तगत केला आहे या प्रकरणी आरोपी सुनिल रमेश खिरडकर वय २७ रा. मोरे चौक, औरंगाबाद रा. जातेगांव, ता.नांदगांव, जि. नाशिक ,आणि बाबासाहेब वचन हिरे वय ४७ रा. बहिरगांव, ता. कन्नड जि. औरंगाबाद यांन ताव्यात घेऊन मुद्देमालासह नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक, बी.जी शेखर पाटील ,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर अतिरीक्त कार्यभार विभाग शेवगांव संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सफौ. मनोहर शेजवळ, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके,पोलीस नाईक संदीप दरंदले, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, विशाल दळवी, चापोहेकॉ संभाजी कोतकर, चापोना भरत बुधवंत यांच्या पथकाने केली आहे.