Home शहर पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची लगीनघाई शहर आणि उपनगरातील डांबरीकरणाच्या कामांनी घेतला...

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची लगीनघाई शहर आणि उपनगरातील डांबरीकरणाच्या कामांनी घेतला वेग

नगर दि. ११ जून

अहमदनगर शहरात रस्ता सध्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाली असून अनेक दिवसांपासून रखडलेले डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहेत. त्यामुळे नगरकर खुश आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच ही कामे हाती का घेण्यात आली असा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत.

नगर शहरातील मुख्यतः चितळे रोड भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम आज सुरू करण्यात येत आहे.शनिवारी सकाळी तेलीखुंट ते ग्राहक भांडार दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले. तर तेलीखुंट पॉवर हाऊस ते नेता सुभाष चौक दरम्यानच्या डांबरीकरण सुरू करण्यासाठी यंत्र सामुग्री सज्ज झाली आहे मात्र सध्या पावसाळी वातावरण असून कधीही पाऊस पडू शकतो त्यामुळे या डांबरीकरणाचा उपयोग होईल का असा प्रश्न आता या भागातील नागरिक करू लागले आहेत.

अनेक दिवसांपासून शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामाबाबत शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी बांधकाम विभागाकडे वेळोवेळी आंदोलन आणि निवेदन बैठका घेतल्या होत्या मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो डांबरीकरण सुरू झाल्यामुळे नागरिकांना शहरातील ओबडधोबड रस्तावरील आणि खड्ड्या पासून मुक्ती जरी मिळत असली तरी जर जोराचा पाऊस झाला तर डांबरीकरण किती टिकेल हा प्रश्नही उपस्थित होतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version