औरंगाबाद दि.१७ मे
औरंगाबादमधील वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे तर पर्यटकांसाठी कबरीची सफर बंदच करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. खुलताबाद येथील नागरिकांनी आज अचानकपणे कबरीला पाहण्यासाठी पर्यटकांनी येऊच नये, अशी मागणी केली. पर्यटकांनाही कबर परिसरात येऊ दिलं नाही.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केलं. एमआयएम चे नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि खा. इम्तियाज जलील यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात चांगल्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पहा व्हिडीओ
सर्वच राजकीय पक्षांनी बाहेरच्या लोकांनी येऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडू नये असं वक्तव्य केले होते. मात्र आता हे प्रकरण शांत होण्यास तयार नसून स्थानिक नागरिकही आता आक्रमक झाले आहेत. या ठिकाणची कबर उखडून टाका अशी मागणीही पुढे आली आहे. तर या मागणीमुळे पोलिसांनी कबरीच्या अवतीभवती पोलिस बंदोबस्त लावला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत