अहमदनगर दि९ जुलै
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बकरी ईद संदर्भात राज्याच्या डीजीपींना सूचना दिल्या आहेत. डीजीपी याना पत्र लिहून बकरी ईदला गायीची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले. गायीचे मांस विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्याला पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दहा हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
या संदर्भात आता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही सूचना दिल्या असून कुणीही कांची पत्तल करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.