बीड दि.३०एप्रिल
बीड जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्नां आता पूर्णत्वास जात असून बहुचर्चित नगर बीड परळी रेल्वे मार्गवरील नगर ते आष्टी दरम्यान पहिल्या टप्य्या तील रेल्वे ७ मे धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले आहे. मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. त्यावर रेल्वे विभागाने सर्व तांत्रिक बाजू तपासून घेतल्या आहेत एक महिन्यापूर्वी या मार्गावर १२९ प्रति तास वेगाने रेल्वे धावली होती गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर ते आष्टी दरम्यानच्या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान अहमदनगर- आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने बीड जिल्ह्यातील नागरिक अधिक उत्सुक असून प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या रेल्वे मार्गा बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून रेल्वे मार्ग प्रत्यक्ष कामास सुरुवात केली होती त्यानंतर माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केलेला आहे.