Homeजिल्हाविजवीतरणच्या कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या नगर तालुक्यातील प्रकार मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत...

विजवीतरणच्या कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या नगर तालुक्यातील प्रकार मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत दोषी असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही – संदेश कार्ले

advertisement

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर
नगर तालुक्यातील शेतकरी पोपट जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून गळा फास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांची शेती असून त्यांनी गहू आणि हरबरा पेरणी केली असल्यामुळे पेरणी नंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची मोठी गरज असते मात्र वीज वितरण कंपनीने गेल्या आठ दिवसापासून वीज खंडीत केल्याने पोपट जाधव  रोज शेतीमध्ये जाऊन वीजपुरवठा सुरळीत  झाला का नाही याची पाहणी करून पुन्हा येत होते. मात्र गव्हाचे पीक समोर असताना पाणी असूनही वीज खंडित केली गेल्यामुळे गव्हाच्या पिकाला पाणी  देऊ शकत नसल्याचे खंत मनात ठेवून त्यांनी अखेर आज पहाटेच्या दरम्यान शेता जवळील एका झाडाला गळा फास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेनंतर नगर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून जोपर्यंत वीज मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे पोलिसांनी सुमोटो करून स्वतः वीज वितरण मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दोषी असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular