मुंबई दि.७ ऑगस्ट
औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खोटा इतिहास दाखवला जात असून खरा इतिहास दाखवला तर हिंदू समाज देखील तो मान्य करतील, असं वक्तव्य आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली आहे.
औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही.” असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केलाय. या ट्विटमध्ये त्यांनी अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? असा सवाल देखील केला आहे. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, त्यांची असं बोलण्याची हिम्मत कशी होते? अशी टीका संभाजीराजे यांनी केलीय. .