कोल्हापूर दि ३ मे
राज ठाकरे यांचा भोंगे काढण्याचा अल्टीमेटम आणि संपूर्ण राज्यात सुरू असलेले भोंग्या वरून सुरू असलेले राजकारण आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात कोल्हापूरच्या मुस्लीम बांधवांनी धार्मिक सलोखा कायम ठेवणारा संदेश देत धार्मिक तेढ मजवणाऱ्या लोकांच्या डोळ्यातच चांगलंच अंजन घातलंय मुस्लिम बांधवांनी मोठी रॅली काढत जय शिवाजी महाराज घोषणा देत भगवे झेंडे हातात घेऊन शहरात वेगळंच वातावरण तयार केलं.
ठीक ठिकाणी जय शिवाजी जय भवानी’ अशा जयघोषात प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणुका आणि त्यातील ढोल-ताशांचा गजर, चित्तथरारक मर्दानी खेळ, घोडे, उंट, मावळ्यांचे सजीव चित्र, हलगी ताफा, लेझीम यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
हिंदू-मुस्लिम समाजाने कोल्हापुरातून संपूर्ण राज्याला आदर्श ठरेल असा एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे.
पहा व्हिडीओ