अहमदनगर दि.१५ एप्रिल (सुशील थोरात)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) महाराष्ट्रासह देशभरात साजरी झाली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. मिरवणुका निघाल्या. थाटामाटात जयंतीचा उत्सव पार पडला. या सगळ्या उत्सवात एक सामाजिक सलोखा जपणारी गोष्ट अधोरेखित झाली. ही घटना पाहिल्यानंतर सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न नेमका कसा, केला जातो, हे अधोरेखित झालंय. आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत डीजे वाजवला जात होता मिरवणूकीतील सामाजिक न्याय विभाग राष्ट्टवादी काँग्रेस पार्टीचे मंडळ शहराचे ग्रामदैवत माळीवडा गणपती मंदिराजवळ होते आणि ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात रात्रीची आरती सुरू झाली हे कळताच मिरवणुकीतील काहीं कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. मिरवणुकीतील डीजे थांबवला.आणि गणपतीची आरती डीजे वर सुरू केली आणि सर्वांनी गणपती आरतीवर टाळ्या वाजवत मिरवणूक मंदिरा पासून पुढे नेली
तर असाच काहीसा प्रकार आशा टॉकीज चौकात आल्यानंतर पाहायला मिळाला या हुसैन कव्वाली लावून आशा टॉकीज परिसरात भीम सैनिकांसह काही मुस्लिम बांधवांनी डीजे वर ठेका धरल्याच चित्र पाहायला मिळालं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिकृती असकेले निळ्या भगव्या झेंड्यासह हिरव्या झेंडे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते हेच सामाजिक सलोख्याचा तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वधर्मसमभाव या विचारांचा वारसा जपण्याचं काम भीम सैनिकांनी केलं.