Homeशहरगतिरोधकांमुळे उड्डाण पुलावरील अपघाताची मालिका थांबेना..पुन्हा तीन गाड्यांची एकमेकांना धडक.. नियमात नसलेले...

गतिरोधकांमुळे उड्डाण पुलावरील अपघाताची मालिका थांबेना..पुन्हा तीन गाड्यांची एकमेकांना धडक.. नियमात नसलेले गतिरोधक काढावे मागणीला केराची टोपली

advertisement

अहमदनगर दिनांक 29 नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील नव्याने झालेल्या उड्डाणपुलाची साडेसाती संपता संपेंना शहरातील उड्डाणपूल सुरू झाल्यापासून रोजच छोटे-मोठे अपघात या उड्डाणपुलावर होत आहेत. विशेष म्हणजे उड्डाण पुलावरील केलेल्या गतिरोधकांमुळे या अपघात होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतरही हे गतिरोधक काढण्याची तसदी बांधकाम ठेकेदाराने घेतलेली नाही. उड्डाणपूलावर गतिरोधकामुळे रोजच अपघात होत आहेत मात्र तरीही प्रशासन ढिम्म असून नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक लोकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.


उड्डाण पुलावर असलेले नियमात नसलेले गतिरोधक काढावे अशी मागणी वेळोवेळी अनेक संघटनांनी केली आहे. मात्र तरीही या संघटनांच्या निवेदनाला बांधकाम विभागाने तसेच ज्या विभागाकडे हा उड्डाणपूल येतो त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एसबीआय चौकाकडून अशोका हॉटेल कडे येणाऱ्या वळणावर उड्डाण पुलावर असलेल्या गतिरोधकामुळे तीन वाहनांची धडक झाली आणि यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कोतवाली पोलीस आणि भिंगार कॅम्प पोलीस पोहचले आहेत. मात्र या अपघातामुळे औरंगाबाद रोड वरील थेट राज चेंबर पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular