अहमदनगर दि. ३० ऑक्टोबर
महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला असून बीड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.जाळपोळ आणि फोडाफोडीच्या घटना घडल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता मराठा आंदोलन हे चांगलेच पेटले असून याचे पडसाद ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी राजकीय पुढाऱ्यांचे फोटो असलेले बॅनर फाडणे अथवा बॅनर वरील फोटोना काळे फसण्याचा प्रकार सध्या सुरू आहेत याची खबरदारी म्हणून आता अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील सर्वच राजकीय नेत्यांचे बॅनर काढण्याची मोहीम तातडीने रात्री उशिरा हाती घेतली आहे. मराठा आरक्षणाचा चांगला धसका आता राजकीय नेत्यांनी तर घेतलाच आहे.त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला दिसतोय.