अहमदनगर दि.१७ सप्टेंबर
अहमदनगर शहरात(ahmednager city) नेमकं चाललंय काय हेच समजायला तयार नाही. नगर शहरातील रस्ते (road) अत्यंत खराब झाले आहेत मात्र प्रशासनापासून राजकारण्यांपर्यंत ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच शांत आहे. नगर शहर हे सहनशील माणसांचे शहर बनत चालले आहे. नगर शहरातील वाहतूक सुद्धा अशाच प्रकारे सुरू आहे शहरातील बेशिस्त वाहतुकीकडे शहर वाहतूक शाखेचे पोलीस लक्ष द्यायला तयार नाही कोणीही कोठेही वाहन लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात मात्र सहनशील नगरकर यातूनही वाकडातिकडे मार्ग काढून प्रवास करत राहतात. शहरात दुचाकी वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत मात्र चोर पकडले जात नाही तरीही नगरकर शांतच आहेत.
त्याचप्रमाणे आता सहनशील नगरकरांनी बरोबरच सहनशील व्यावसायिकांना काही स्वयंघोषित नेते त्रास देत असल्याची माहिती समोर येत आहे. गणपती उत्सव (Ganapati festival) होऊन गेला मात्र वर्गणीच्या नावाखाली अनेक व्यावसायिकांना नाहक त्रास देण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा रक्कम मागून व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेण्यात आली होती. ज्या व्यापाऱ्यांनी(businessmen) वर्गणी दिली नाही अशा व्यावसायिकांना आता काही लोकांकडून त्रास देणे सुरू झाले असून यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.
शहरातील परिस्थिती पाहता व्यापारी या त्रासा मुळे भयभीत झाले असून मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा प्रश्न आता व्यापारी बांधवांसमोर उभा आहे. कारण हा त्रास आता अत्यंत भयानक पद्धतीने देणे सुरू झाले असून या त्रासाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. गणपती उत्सव होऊन गेला तरी अध्यापही काही लोक वर्गणीसाठी आद्यपही तगादा लावून आहेत आणि रोज कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
यामुळे शहरातील बाजार पेठेत या लोकांविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून यांना कुठेतरी चाप बसने गरजेचे आहे. पोलिसांकडे गेल्यानंतर पुन्हा राजकारण मध्ये येणार आणि पुन्हा पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागणार म्हणून व्यवसायिक पोलिसांकडे जाण्यास धजावत नाही मात्र आता याचा उद्रेक कधी येऊ शकतो.