अहमदनगर दि.११ नोव्हेंबर –
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहराला द्या आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू नगर शहराला कुस्तीचा वारसा लाभला आहे तो जोपासण्यासाठी काम करायचे आहे सध्या जिमचे फॅड आले आहे त्यामुळे पैलवान कोल्हापूरला जायचे बंद झाले आहे युवकांना कुस्ती क्षेत्राकडे वळविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे मोबाईल सारखे साधन युवकांच्या हातात पडले आहे त्यांना व्यायामाकडे वळविणे गरजेचे आहे नगर शहराच्यावतीने कुस्तीगीर परिषदेचे राज्याच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला आहे. अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र केसरी स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी वाडिया पार्क मैदानाची पाहणी केली यावेळी आ. संग्राम जगताप, सचिव अमृता भोसले, दयानंद भट्ट, सुभाष ढोले, चंद्रकांत शिंदे, युवराज घोरपडे, विजय कुरणे,पै. संतोष भुजबळ, पै.शिवाजी चव्हाण,पै.प्रवीण धूले, पै. शिवाजी कराळे, पै.गुलाबराव बर्डे,पै.काशीद, पै.अनिल गुंजाळ, विठ्ठल लांडगे, पै.युवराज करंजुले, पै.शंकर खोसे,पै.उमेश भागानगरे, पै.अफजल शेख,पै.अतुल कावळे, पै.दादा पांडुळे, पै.मोहन गुंजाळ, पै.प्रमोद गोडसे, पै.संदीप कावरे, पै.मधुकर उचाळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजनासाठी अहमदनगर जिल्हा सह तीन जिल्ह्यांनी मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर नगर शहरातील मैदानाची पाहणी केली आहे चारही जिल्ह्यांची पाहणी झाल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद निर्णय घेणार आहे आज मी सांगू शकत नाही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे. ही स्पर्धा नगरला व्हावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे असे ते म्हणाले.