Home शहर भाग्योदय कॉलनी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नतून बॅटमिंटन मैदान लोकार्पण सोहळा...

भाग्योदय कॉलनी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नतून बॅटमिंटन मैदान लोकार्पण सोहळा संपन्न विकासाच्या आशेची किरण म्हणजे आमदार संग्राम जगताप : शिरीष मोडक

अहमदनगर दि.३ नोव्हेंबर :
माझा व आमदारांचा परिचय उशिरा झाला  पण आम्ही सांगितलेली कामे ते वेळेवर पूर्ण करतात अहमदनगर जिल्हा वाचनालय सावेडी शाखेसाठी जागा हवी होती सावेडी उपनगरातील नागरिकांची वाचण्याची भुक भागवण्यासाठी त्यांनी 14000 स्क्वेअर फूटचा प्लॉट उपलब्ध करून दिला आहे  त्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे सुद्धा झाले आहे.आमदार संग्राम जगताप हे खरे  कार्यसम्राट आहे. त्यांनी नगरकरांचे विकास कामातून मने जिंकली आहे त्यांना दूरदृष्टी चांगली असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी विकासाची कामे सुरू असल्याचे दिसत आहे पूर्वी आश्वासने दिली जायची पण पूर्तता केली जात नव्हती आता विकासाच्या आशेची किरण म्हणजे आ. संग्राम जगताप हे आहे असे प्रतिपादन शिरीष मोडक यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून प्रोफेसर भाग्योदय कॉलनी येथे बॅटमिंटन चे मैदान लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश  भागनगरे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, ॲड भीमराव काकड, शिरीष मोडक, मच्छिंद्र पागिरे, मेघा क्षीरसागर, अशोक सरनाईक, नंदन कामत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की विकास कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे आपल्या सर्वांना नगरच्या पुढच्या पिढीसाठी काम करायचे आहे काही लोक व्यक्तीगत स्वार्थासाठी शहराची नकारात्मक चर्चा करत असतात याकडे दुर्लक्ष  करीत विकासाचे काम उभे करायचे आहे सरकार जरी बदलले असले तरी शहर विकासाचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहर विकासाचे मंजूर कामे पूर्ण करून शहराचे नाव उंचवायचे आहे असे ते म्हणाले.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की आमदार संग्राम जगताप हे  शहर विकासाबरोबर धार्मिकता, क्रीडा,संस्कृती, सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमाकडे जातीने लक्ष देऊन भाग घेत असतात सर्वांच्या सूचनेला मान देऊन ती कामे मार्गी लावली जात आहे. रस्त्यांच्या प्रश्नांबरोबरच शहरांमध्ये भव्य दिव्य हॉस्पिटलची निर्मिती सुरू केली आहे याचबरोबर म्युझिकल फाउंटन, स्पोर्ट क्लबचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
यावेळी ॲड भीमराव काकडे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा क्षीरसागर यांनी केले. व आभार प्रदर्शन मच्छिंद्र पागिरे यांनी मांनले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version