अहमदनगर दि.१४ मे
पोलीस दलामध्ये सध्या सर्वांना वेध लागले आहेत ते बदल्यांची मे महिना उजाडाला की सर्वांना वेध लागतात ते आपल्या बदल्यांचे ज्या कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पाच वर्ष झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली असून सध्या ते कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या पैकी अनेकांना स्थानिक गुन्हे शाखेत बादली हवी आहे. त्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. मात्र आता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीसमहानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेत बदली करणाऱ्या कर्मचार्यांच्या बाबतीत काय निकष असावेत याबाबत परिपत्रकात सविस्तर माहिती दिली असून यामध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच स्थानिक गुन्हे शाखेत स्थान मिळू शकते.
काय म्हंटलंय परिपत्रकात पाहूया, दि. १६ . १० . २०१४ नुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी गुन्हे अन्वेषण विभागात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांचीच नेमणूक करण्यात यावी. मात्र असे असताना ज्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचा (क्राईम डिटेक्शन) अनुभव नसताना त्यांची नेमणूक केली जाते.
यापुढे अटी पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्याच एलसीबीमध्ये नेमणूका करण्यात याव्यात. अधिकारी आणि कर्मचार्यांच्या नेमणूका करताना क्षमता, सचोटी, योग्यतेचे व्यावसायिक निकष, गुन्हेगारांची आणि अन्वेषणाबाबतची माहिती तपासण्यात यावी, या अधिकारी आणि कर्मचार्यांचं १० वर्षांत एकूण अॅव्हरेज ग्रँडींग B + च्या खाली नसावं, सेवा अखंडित असावी, कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी, फौजदारी खटला प्रलंबित नसावा,
गुन्हे अन्वेषण विभागातून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं, कमीत कमी दोन पोलीस ठाणे मिळून ६ वर्षांचे कर्तव्य केलेलं असावं, स्वतंत्रपणे गुन्हे उघडकीस आणलेले असावेत, मागील दहा वर्षांत कोणतीही शिक्षा नसावी, क्राईम डिटेक्शनवर ७५ मार्क चाचणी, ज्यामध्ये ४० मार्क्स आॅब्जेक्टिव्ह आणि ३५ मार्क्स प्रॅक्टिकल परीक्षा घ्यावी. स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या नेमणूका करताना मेरिटलिस्टप्रमाणे नेमणूका करण्यात याव्यात, असं आयजींच्या या परिपत्रकात म्हटलं आहे.