k
मुंबई – दि. २३ एप्रिल
आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खा. संजय राऊत आणि अनिल परब यांच्या सह पाचशे ते सहाशे अज्ञात शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले असून संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावणी दिल्याचा तसेच जीव घेण्याचा हे कट केलाअसल्याचा राणा दाम्पत्यांनी आरोप केला आहे . आमचे मुंबई आणि अमरावती येथील घरावर शिवसैनिकांनी घेराव टाकला असून त्या ठिकाणी तोडफोड केली आहे आमच्या जीविताला धोका असून याला सर्वस्वी जबाबदार शिवसेनेचे नेते असल्याचं तक्रारीत राणा दांपत्याने सांगितला आहे.