अहमदनगर दि.१८ जून
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा संवाद दौरा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला यावेळी नगर शहर , तालुका , पारनेर , श्रीगोंदा , कर्जत , जामखेड , नेवासा , राहुरी या दक्षिण मतदारसंघातून २५० इच्छुकांनी मुलाखती दिल्या मनविसेचे राज्य सरचिटणीस अखील चित्रे , संदीप पाचंगे आणि सायली सोनवणे हे निरीक्षक म्हणून मुंबईतून पाचारण करण्यात आले होते .गेल्या १६ वर्षात विद्यार्थी सेनेच्या केलेल्या कामाला अजून पुढे नेण्यासाठी आणि युवकांचे खांदे बळकट करण्यासाठी विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यात येत आहे . त्याच प्रमाणे नवयुवकांनी राजकारणामध्ये स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ या भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची निवड करावी या दृष्टिकोनातून युवकांशी संवाद साधला गेला तसेच शहरातील काही पत्रकार मित्रांशी देखील निरीक्षकांनी अनौपचारिक गप्पा मारत संवाद साधला. मुलाखती दरम्यान युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या प्रमुख आकर्षणाने मोठ्या प्रमाणात युवक विद्यार्थी सेनेचे काम करण्यासाठी इच्छुक आहेत हे या मुलाखतीच्या दरम्यान जाणवले त्याच प्रमाणे या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक देखील निरीक्षकांनी केले.
मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नाने वेधले लक्ष –
नगर जिल्ह्यातील या दौऱ्यादरम्यान मुलींचा सहभाग लक्षणीय दिसून आला पण आलेल्या मुलींनी नगर शहरातील काही महाविद्यालयांमध्ये होत असलेल्या मुलींना होत असलेल्या त्रासा बाबतीत माहिती दिली त्यामध्ये छेडछाडीचा प्रकार , रस्त्याने मोबाईल नंबर मागणे , महाविद्यालयाबाहेर टोळक्यांतुन मुलींवरील कमेंट्स , मुलींच्या गाडीचा पाठलाग करण्याचे प्रकार सांगत असुरक्षिततेची भावना व्यक्त केली यावर येत्या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्याचे आदेश निरीक्षकांनी केले निवेदन देऊन देखील जर मुलींच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले तर मनसेकडे खळखट्याक च्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात याबद्दल सर्वांनाच माहिती आहे.
बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर भाष्य –
नगर जिल्ह्यातील या प्रकाराबद्दल विचार करून निरीक्षक निरीक्षकांनी लोकप्रतिनिधी वर देखील ताशेरे ओढले ज्या मतदारसंघात वारंवार तीच लोकं निवडून दिली जातात त्याच मतदार संघात लोकप्रतिनिधी मुलींची महिलांची सुरक्षेची हमी देखील घेऊ शकत नाही यापेक्षा वाईट प्रकार अजून काय समजायचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे प्रतिपादन विद्यार्थी सेना सरचिटणीस अखेर चित्रे यांनी केले , येत्या १ ऑगस्ट रोजी पासून विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी आणि नविन शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या बाबत देखील निरीक्षकांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा , प्रकाश गायकवाड, संकेत जरे , राहुल वर्मा , मनीष मेढे , प्रवीण गायकवाड , अनिकेत शियाळ, प्रमोद जाधव , उपस्थित होते.