नाशिक दि १८ एप्रिल
३मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा ३ मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आदेशात म्हटलंय.
मुस्लिम धर्मियांना देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर हनुमान चालीसा लावायची असल्यासही पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. अजान पूर्वीं १५ मिनिटं आणि१०० मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसैनिकांनी मशिदसमोर भोंगे लावले होते. तर काही ठिकाणी प्रशासनाने हस्तक्षेप करत मनसैनिकांना रोखले होते.