Home Uncategorized नगरकर पाण्यात मनपा प्रशासन कोमात, अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने घरे,दुकाने बुडाली असताना...

नगरकर पाण्यात मनपा प्रशासन कोमात, अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने घरे,दुकाने बुडाली असताना मनपाची पाणी उपसण्याचे सर्व यंत्रणा बंद

अहमदनगर दि.५ ऑगस्ट

अहमदनगर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. तर अनेक घरात दुकानांत पाणी शिरले असून. पाऊस थोडी फार विश्रांती घेऊन पुन्हा बरसत असल्याने तळघरात असलेल्या दुकानात तसेच काही घरात पाणी साचले आहे.मात्र हे काढण्यासाठी महापालिका प्रशासना कडे जे पाणी काढण्याचे यंत्र (सक्शन पंप) आहेत ते सर्व बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती सांभाळण्या साठी तयारीत राहणे गरजेचे असते.मात्र अनेक ठिकाणी पाणी घरात दुकानात साचले असताना त्याचा उपसा करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे. महापालिका प्रशासनच्या ताफ्यात एक नवीन गाडी दाखल झाली आहे मात्र त्या गाडीतील यंत्रणा काही तंत्तिक कारणामुळे बंद असल्याची माहिती मिळतीय त्या मुळे महापालिका प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा करते काय असा प्रश्न निर्माण होतोय अहमदनगर शाहरतील नागरिक कर भरून महापालिका प्रशासना कडून आरोग्य पाणी रस्ते वीज आशा माफक गरजेची अपेक्षा ठेवते मात्र शहरातील रोड, वीज, या बाबतीत तीन तेरा वाजले आहेत तर आपत्कालीन परिस्थिती असताना सर्व यंत्रणा बंद असल्याने महापालिका प्रशासनाचा नागरकारांना उपयोग काय हा प्रश्न उपस्थित होतोय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version