Home शहर मनपा अतिक्रमण विभाग झोपलेलाच.. चौपाटी कारंजा चौक महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना विकला काय?...

मनपा अतिक्रमण विभाग झोपलेलाच.. चौपाटी कारंजा चौक महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना विकला काय? रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई कधी ?

अहमदनगर दिनांक 22 नोव्हेंबर

अहमदनगर शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा धाकच नसल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. त्याला कारणीभूत नगर शहरातील राजकारणही आहे. कारण एखाद्याचे अतिक्रमण काढायला गेल्यानंतर त्या ठिकाणी राजकीय व्यक्तींचा, समाजकारण करणारे अथवा गल्ली नेत्याचा फोन आल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला मोकळ्या हाताने माघारी फिरावे लागते.मात्र आता हे अतिक्रमण धारक नगरकरांच्या डोक्यावर बसल्यासाचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.

नगर शहरातील प्रचंड वाहतुकीचे आणि गर्दीचे ठिकाण म्हणजे चौपटीकरांच्या हे असून अहमदनगर शहरातील जुन्या शहरात जाण्यासाठी नागरिक या मार्गाचा वापर करतात नालेगाव,जुने कोर्ट चितळे रोड आणि दिल्लीगेट कडून येणारी वाहतूक या चौकात येऊन थांबते. मात्र या ठिकाणी अतिक्रमण करून उभा असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या जसे काय महानगरपालिकेची जागा विकत घेतल्यासारख्या लावल्या जातात. या ठिकाणी नाश्त्यासाठी उभा राहणारे ग्राहक रोडवरच गाड्या पार्किंग करून नाश्ता करत असतात. दुसरीकडे या ठिकाणी समोरच मंदिर असल्याने त्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या आणि रोडवर बसणारे भाजीपाला विकणारे विक्रेते यामुळे हा चौक अत्यंत छोटा होतो आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होती. या ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवाव्यात आणि या रस्त्याचा श्वास मोकळा करावा अशी मागणी वारंवार होत असताना फक्त नावापुरती महानगरपालिकेची कारवाई होत असते.

गेल्या दोन दिवसापूर्वी अहमदनगर शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने शहरातील अनेक अतिक्रमणे रात्रीतुन गायब झाली होती. हे अतिक्रमणे पुन्हा दुसऱ्या दिवशी उभी ठाकली असून त्या दिवशी मोकळे आणि मोठे दिसणारे रस्ते पुन्हा अरुंद दिसू लागले आहेत. महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम वारंवार राबवी आणि कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version