अहमदनगर दि.९ ऑगस्ट
अहमदनगर ते मनमाड हा महामार्ग सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा महामार्ग बनवण्यासाठी नेमलेले तीन ते चार ठेकेदार काम सोडून गेले आहेत. तर मध्यंतरी थेट भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हा रोड काही लोकप्रतिनिधी मागितलेल्य पैशामुळे ठेकेदार काम सोडून निघून जात असल्याचा आरोप केला होता.
सध्या या रस्त्यावरील देहरे येथील बंद पडलेल्या टोल नाक्यावर एक बोर्ड अज्ञात व्यक्तीने लावला असून हा बोर्ड मात्र चर्चेचा आणि वस्तूस्थिती दाखवणार आहे. नितीन गडकरी यांना उद्देशून हा बोर्ड लावण्यात आला आहे .
“अहो गडकरी साहेब आपण भाषणामध्ये सांगता भारतामधले रस्ते अमेरीकेसारखे गुळगुळीत करणार नगर मनमाड रस्त्याचा ठेकेदार पळुन गेला की पळुन लावला”
असा आशयाचा हा फलक सध्या जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून.या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी एका अज्ञात प्रवाशाने हा फलक लावला आहे.