Home शहर नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा भारतीय रिझर्व बँकेकडून बँकेवर लादण्यात आलेल्या...

नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा भारतीय रिझर्व बँकेकडून बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर जमा झालेले खातेदारांचे पैसे परत मिळणार

अहमदनगर दि.6 ऑगस्ट

नगर अर्बन कॉपरेटिव मल्टीस्टेट शेड्युलड बँकेवर दिनांक ०६ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय रिझर्व बँकेकडून निर्बंध लावण्यात आलेले असून कोणत्याही खातेदाराकडून कुठल्याही ठेव स्वरूपात ठेवी स्वीकारण्यावर सदर निर्बंधातून बंधने घालण्यात आलेली होती. असे असताना देखील काही खातेदारांच्या सेविंग व चालू खात्यांवर अनावधानाने व संबंधित खातेधारकांकडून त्यांच्या व्यवसायाशी निगडित घेणेदारांना यापूर्वीच खाते क्रमांक व बँकेचे आयएफसी कोड, आरटीजीएस डिटेल्स दिलेले असल्याने देणीदार यांचे मार्फत सदर खातेदारांच्या खात्यावर पैसे जमा केल्याने खातेदारांची रक्कम बँकेत अडकलेली होती. बँकेत आरटीजीएस एनईएफटी हा गेटवे संपूर्णरित्या बंद करता येत नाही कारण ज्या खातेदारांना बँकेने कर्ज अदा केलेले आहेत अशा खातेदारांचे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम तसेच आरटीजीएस एनईएफटी द्वारे वसुली करणे कामी सदर गेटवे खुला ठेवण्यात आलेला असल्याने कर्ज खात्यां व्यतिरिक्त इतर खात्यांवर देखील रकमा जमा झालेले आहेत पैकी काही खातेदारांनी आपले खाते बंद केलेले असून देखील त्यांना देणे लागत असणाऱ्या त्यांच्या देणीदारांनी त्यांच्या नगर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या खात्यांवर पैसे आरटीजीएस व एनईएफटी द्वारे रक्कम जमा केलेली होती. सदर पैसे परत मिळणे कामी अनेक खातेदारांनी बँकेकडे तसा पाठपुरावा देखील केलेला होता.

मात्र बँकेवर दिनांक ०६/१२/२०२१ रोजी आलेल्या निर्बंधानंतर सदर पैसे परत करण्याचा मार्ग खडतर झाला होता व त्या कामी सातत्यपूर्ण पाठपुरावा नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून रिझर्व बँकेशी करण्यात येत होता. या कामी रिझर्व्ह बँकेकडून वेगवेगळी पूर्तता करणेकामी बँकेस सांगितले गेल्याने सदर कामात उशीर झाला व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकर अदा करण्यास बँकेला वेळ लागत होते. या कामी भारतीय रिझर्व बँकेशी प्रभारी चेअरमन सौ दिप्ती गांधी यांच्या पुढाकारातून संचालक ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी व संपूर्ण संचालक मंडळ यांनी रिझर्व बँकेशी संपूर्ण पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावला आहे व त्यास रिझर्व बँकेकडून सदर दिनांक ०६/१२/२०२१ रोजी नंतर जमा झालेले पैसे ही बँकेवर येणारी अतिरिक्त लायबिलिटी असल्याने व ती स्वीकारण्यास भारतीय रिझर्व बॅंकेकडून बंधने घालण्यात आलेली असल्याने सदर पैसे परत करण्याची बँकेची विनंती भारतीय रिझर्व बॅंकेकडून मान्यझाल्याचे पत्र प्राप्त झालेले आहे. या कारणाने बँकेच्या सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे व बँकेत ज्या ज्या ठेवीदार खातेदारांच्या सेविंग करंट खात्यात दिनांक ०६/१२/२०२१ नंतर अनावधानाने रकमा जमा झालेले आहेत त्या त्यांना सोमवारपासून परत करण्यात येणार आहेत असे संचालक ईश्वर बोरा यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version