Home शहर नैसर्गिक ओढे नाले बुजवून प्लॉटिंग करण्याचे पाप कोणाचे शहर हळूहळू तुंबू लागलेय...

नैसर्गिक ओढे नाले बुजवून प्लॉटिंग करण्याचे पाप कोणाचे शहर हळूहळू तुंबू लागलेय नागरकारांनो आताच जागे व्हा अन्यथा भविष्यात शहरासह तुमचे घर पाण्याखाली जाईल

अहमदनगर दि.४ ऑगस्ट

दरवर्षी पावसाळा आला ती अनेक घरांमध्ये पाणी घुसते हा विषय आता गंभीर होत असून दिवसेंदिवस घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार वाढत आहे उपनगरांमध्ये लोक वस्तीत अशी वाढत आहे त्याप्रमाणे नैसर्गिक पुढे नाले बुजवण्याचं काम सुरू झालं आहे त्यामुळे इतर वेळेस नाही मात्र पावसाळ्यात याचा त्रास प्रामुख्याने जाणवतो प्रश्न हा आहे की नैसर्गिक ओढे नाले बुजवतो कोण आणि याला बुजवायला परवानगी देते कोण?

अहमदनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे शहरातील सर्व भूखंडांची माहिती असते नैसर्गिक ओढे नाले कुठून जातात कोणत्या मार्गे नदीला जुळतात या सर्व प्रकारची माहिती आणि नकाशे त्यांच्याकडे असताना नवीन वसाहती उभारताना परवानगी देताना एवढे नाले बुजवले जातात याकडे नगररचना विभाग लक्ष देत नाही का? तसेच अनेक नैसर्गिक नाले मोठमोठे पाईप टाकून बुजवण्यात आले आहेत. त्यांच्या आजूबाजूला मोठी लोक वस्ती झाल्यामुळे या ओढ्यान नालीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.मात्र ही गोष्ट नगररचना विभागाच्या लक्षात येत नाही का? आणि येत असूनही ते ओढे नाले बुजवणाऱ्या लोकांवर कारवाई का करत नाही. असा सवाल उपस्थित होतोय.

शहराचे विद्रूपीकरण रोखायचे असेल आणि भविष्यातील पावसाळ्यातील पूर परिस्थिती टाळायची असेल तर नैसर्गिक ओढे नाले पुन्ह उकरून त्यांचा स्रोत आहे त्या मार्गाने जाऊ देणे हाच मार्ग आहे. मात्र यासाठी आता नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. कारण लाखो करोड रुपये देऊन आपण जागा घेतो घर बांधतो आणि त्याच घरात पावसाळ्यात पुराचे पाणी घुसत असेल तर याला जबाबदार कोण त्यामुळे नैसर्गिक ओढे नाले बचाव ही मोहीम नागरिकांना सुरू करावी लागणार आहे अन्यथा जागोजागी अशी परिस्थिती भविष्यात होऊ शकते.(क्रमशः

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version