अहमदनगर दि.२० एप्रिल
ऐतिहासिक नगर शहराच्या वैभवात भर घालणारे आणि महापालिकेला शाश्वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या पिंपळगाव तलावात लवकरच नौकाविहार सुरू होणार आहे. या साठी महापालिकेच्या महापौर रोहिनीताई शेंडगे यांनी पुढाकार घेतला असून प्रशासकीय पातळीवर या बाबतची फाईल अंतिम टप्प्यात अली आहे.
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल ७०० एकरच्या पिंपळगाव माळवी तलाव रूपी जमिनीची वाटचाल पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यापासून पर्यटनस्थळाकडे होताना दिसतेय अहमदनगर शहरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पिंपळगाव तलाव मोठा असून या ठिकाणी नौकानयन सुरू झाले तर महापालिकेला मोठ्या प्रमाणत उत्पन्न सुरू होईल आणि बाहेरच्या पर्यटकांसह नगर मधील नागरिकांना फिरण्यासाठी एक चांगले स्थळ उपल्बध होईल.
१९२२ पासून पिंपळगाव माळवी तलाव योजनेतून नगर शहराला पाणीपुरवठा होत होता. तो तब्बल ५० वर्षे सुरू होता.नंतर मुळा धरणातून नवी पाणी योजना सुरू झाली आणि १९७०-७२ नंतर पिंपळगाव माळवी येथून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. त्यानंतर अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला हा परिसर व तलाव मागील पाच-सहा वर्षांत पुन्हा चर्चेत आला तो महापालिकेने आपले नाव या जगेच्या मालकी हक्कवर लावले तेव्हापासून पिंपळगाव माळवी तलाव हा शिर्डी शिंगणापूर देवस्थानला जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ तर आहेच आता नव्याने होत असलेल्या सुरत हैदराबाद हा महामार्ग याच तलावाजवळून जाणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने ही एक चांगली बाब आहे.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पाठपुरावा सुरू केला असून त्याला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी साथ असल्याने हा नौकाविहार लवकर चालू होईल अशी अपेक्षा असून त्या बाबत निविदा काढण्याबाबत प्रधासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. या तलावाच्या आसपास सुशोभकारण खेळणी तसेच बैठक व्यवस्था, बगीचा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे.
याआधी पिंपळगाव माळवी तलावा मध्ये खाजगी लोकांनी नौकाविहार सुरू केले होते. या नौका विहाराला पर्यटकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. मात्र तत्कालीन राजकारण आणि महापालिकेच्या मालकीच्या बाबत निर्णय नसल्याने त्या खाजगी माणसाला नौकानयन बंद करावे लागले होते.