अहमदनगर दि.२२ ऑक्टोबर
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे गायी, बैल, गुरं यांना मान दिला जातो. बैलांसाठी बैल पोळा तर गायीसाठी आपल्याकडे वसुबारस हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे.
दिवाळीची सुरुवात ही गाईच्या पूजनाने होते गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. खरं तर वसुबारस हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. गायी आणि वासरांना मान देण्यासाठी हा सण साजरा करतात.
अरुणोदय गोशाळा येथे वसुबारस निमित्त गायी वासराची पूजा करण्यात आली यावेळी पार्वती बाई जगताप सुवर्णा जगताप,अर्च़ना गांधी,वैष्णवी फुलडहाऴे,वैभवी फुलडहाळे,शिल्पा फुलडहाळे,ज्ञानेश्वरी गाडळक,रराहुल गांधी,राजेन्द्र चोपड़ा,सुमतिलाल कोठारी,समृद्धि गांधी,संचालक मनिष फुलडहाळे आदी उपस्थित होते.