Home Uncategorized राजसाहेबांच्या दौऱ्यावर टीका करण्याचा अधिकार शिवसेनेने गमवलाय सेना आता अफझल खानाच्या मांडीवर...

राजसाहेबांच्या दौऱ्यावर टीका करण्याचा अधिकार शिवसेनेने गमवलाय सेना आता अफझल खानाच्या मांडीवर बसून सत्ता उपभोगणार्यांनी आम्हाला शिकवू नये – सुमित वर्मा

अहमदनगर दि.१ मे

शिवसेनेने जास्तच लक्ष ठेवलंय राज साहेबांच्या दैऱ्यावर , आणि टिका करायचा अधिकार तरी स्वतः जवळ ठेवला आहे का यांनी ? ५० वर्ष महाराजांच्या नावाने राजकारण करून पण यांना कुबड्यांशीवाय उभं राहता येईना आणि हे आम्हाला महाराजांचा आदर कसा राखावा शिकवणार ? असा सवाल महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला आहे.

शहर शिवसेनेच्या अध्यक्षांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती राज ठाकरे अहमदनगर मधून औरंगाबाद कडे जाताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर गाडी थांबवली मात्र अभिवादन केले हेच त्यांचे हिंदुत्व का अशी टीका शिवसेनेने केल्यानंतर आता मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल आहे.

अरे बाळासाहेबांची हयात गेली ज्यांच्या विरोधात लढण्यात अन् त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या लढ्याला आणि विचारांना तिलांजली देत ज्यांना अफजल खानाची फौज म्हणून भर सभेत तुमचे पक्षप्रमुख बोलतात त्यांच्याच मांडीवर जाऊन सत्ता उपभोगता. भगव्याशी गद्दारी तुम्ही केली अशी टीका सुमित वर्मा यांनी केलीय.

राजसाहेबांनी नगर मध्ये जास्त गर्दी च्या कारणाने पोलिसांच्या सुचनेनुसार खाली न उतरता कार्यकत्यांना अभिवादन करून संभाजीनगर येथील क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले हे पहायला कुणाचे तरी डोळे उसने घ्या म्हणजे दिसेल . नगरच्या मुर्ती आणि संभाजी नगर च्या मुर्तीत वेगळे महाराज दिसतात की काय तुम्हाला ? असा टोला सुमित वर्मा यांनी लगावला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version