अहमदनगर दि.१२ नोव्हेंबर –
विकास कामांतून होत असलेल्या बदलत्या नगरचे प्रतीक आहे चांगल्या विचाराचे व सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या नागरिकांनी एकत्रित येऊन शहर विकासाला चालना देऊ नगर शहरात विकास कामांतून व्यवसायिकांना चांगले वातावरण निर्माण झाले असल्यामुळे देशातील व परदेशीय ब्रँड चे दालने नगरमध्ये येत आहेत त्यामुळे शहरवासीयांना आता पुणे मुंबई येथे जाण्याची गरज भासत नाही. श्रीराम नगर येथे उपमहापौर गणेश भोसले यांनी नियोजनपूर्वक जमिनी अंतर्गत कामे पूर्ण केल्यामुळे रस्ता कॉंक्रिटी करण्याची कामे सुरू झाली आहेत विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपण व संवर्धनाची लोक चळवळ उभी करावी असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

बुरुडगाव श्रीराम नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, राजेंद्र एकाडे, बंडू एकाडे, अविनाश साळुंखे, ॲड. पवार, डॉ.जयस्वाल, संजय गहिले, खंडू काळे, अशोक दरंदले, मीराताई खरपुडे, साधना साळुंखे, अविनाश काळे, सुधीर काळे, माणिक खैरे, राहुल टिळेकर, अनिल बाबर, हरि दरंदले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.