Home शहर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे मात्र एका जागेवर फळविक्री करणाऱ्यांना...

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे मात्र एका जागेवर फळविक्री करणाऱ्यांना शहर वाहतूक शाखेने बाजवल्या नोटिसा

अहमदनगर दि.२८ मे
अहमदनगर शहरात बेशिस्त वाहन चालवणे,तसेच गाडी कुठेही उभा करणे, सिग्नलचे नियम न पाळणे दुचाकी गाडी नंबर प्लेट वर नंबर न टाकता नावे टाकून वाहतुकीचे नियम न पाळणे ही नगरकरांची शान असल्यासारखं काही नागरीक वावरत असतात. मात्र अहमदनगर शहरात कार्यरत असलेली पोलिसांची शहर वाहतूक शाखा नेमके करते काय असाही प्रश्न उपस्थित होतो. काही नागरिक बेशिस्त आहेतच त्यांना शिस्त लावण्याचं काम शहर वाहतूक शाखेने करणे गरजेचे आहेमात्र ते होताना दिसत नाही.

शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न रस्त्यावरून चालणारे पियागो चालक हे नेहमीच नियम तोडून रस्त्यावरून प्रवास करताना दिसतात एसटी स्टँड करून सुरू झालेले यांची वाहतूक एमआयडीसी तसेच उपनगर मध्ये जात असते. मात्र एसटी स्टँड समोरच रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभा करणे, त्या पुढे आल्यावर माळीवाडा चौकामध्ये मधेच गाड्या उभा करून ग्राहकांची वाट पाहणे आणि रस्त्याने चालत असताना कधीही कुठेही मागे पुढे न पाहता ब्रेक दाबाने हे जणू त्यांची शान असल्यासारखं पियगो चालक वागत असतात मात्र त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे.

काही दिवसांपूर्वी थेट नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक बीजी शेखर यांच्यासमोर शहरातील बेशिस्त वाहतूक आणि वाहन पार्किंगची समस्या बाबतचा प्रश्न मांडण्यात आला होता.त्यानंतर जिल्हा अधिक्षक मनोज पाटील यांनी शहर वाहतूक शाखेत जाऊन शहर वाहतूक शाखेच्या कामाचा आढावा घेतला होता. आता कुठे शहर वाहतूक शाखा जागृत झाले सारखी दिसत असून बेशिस्त वाहतूक करणाऱ्या, वाहनावर नंबर न टाकता वाहन चालवणाऱ्या,सिग्नल वर नियम न पाळणाऱ्या, शहरात वर्षानुवर्षे एका ठिकाणी उभा असणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहेत मात्र आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्याकडेला फळ विक्री करणाऱ्या फळविक्रेत्यांना सुद्धा शहर वाहतूक शाखेने नोटीसही काढल्या आहेत जसे पियागो चालक पोटासाठी गाडी चालवतात तसेच हे फळविक्रेते सुद्धा पोटासाठीच याठिकाणी उभे असतात मात्र ते एका जागी उभा असल्यामुळे ते कुठेही वाहतुकीची नियम मोडतात दिसत नाही. मात्र रोडवर चालताना पियगो चालक दिवसभर नियम मोडून वाहतूक करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे योग्य आहे. मात्र विनाकारण रोड शेजारी मोकळ्या जागेत उभा राहणाऱ्या फळ विक्रते भाजी विक्रते यांना नोटीस देऊन शहर वाहतूक शाखेला फक्त टार्गेट पूर्ण करायचे आहे का असंच दिसून येत आहे.

गोरगरीब जनतेला त्रास न देता जे शिस्तीचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे मात्र कारवाईच्या नावाखाली आणि केसेस टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली गोरगरीब जनतेला त्रास देऊ नका अशीच मागणी सर्व सामान्य नगरकर करत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version