अहमदनगर दि.७ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या बाबतीतचे राजकारण आता चांगलेच तापले असून काही दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाण पुलावर जाऊन कामाची पाहणी केली होती तसेच येत्या 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती मध्ये हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. आमदार आणि खासदारांच्या उड्डाण पुलाच्या पाहाणी नंतर चांगलेच वातावरण तापले असून शिवसेनेच्या वतीने या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले तसेच हुड्डाणपूलाचे खरे श्रेय शिवसेनेचे माजी आमदार स्व.अनिल राठोड तसेच माजी मंत्री भाजपचे खासदार स्वर्गीय दिलीप गांधी आणि नगरकरांचे असल्यास यावेळी शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.तर आता नऊ तारखेला काही सामाजिक संघटनांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून या उड्डाणपुलाचे खरं श्रेय सोशिक नगरकरांचे असून नगरकरांनी केलेल्या पाठपुरव्यामुळे आणि नागरिकांच्या कराच्या पैशातून झाला असल्यामुळे नागरिकांनी याचे उद्घाटन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नऊ तारखेला पुन्हा एकदा या उड्डाणपुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम सार्वजनिक पणे होऊ शकतो.
तर आता या उड्डाण पुलाच्या श्रेयवादामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता चांगलीच खरपूस टीका केली आहे.उड्डाणपुलाचे श्रेय घेत असताना नगर शहरातील झालेल्या खड्ड्यांचे श्रेय का घेत नाही असा प्रश्न त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांना केला आहे. तसेच आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता या कामाला सुरुवात झाली तेव्हा कोणी कामगारांना मारहाण करून पळून लावले ठेकेदाराला पळवून लावले आणि उड्डाण पूल करण्याचे काम थांबवले पूल होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे.उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यापेक्षा शहरातील खड्ड्याचे श्रेय घ्या असं असाही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले