Home Uncategorized नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांनी फोडला टाहो… आयुष्यभर कष्ट करून साचलेला पैसा बँकेत...

नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांनी फोडला टाहो… आयुष्यभर कष्ट करून साचलेला पैसा बँकेत गुंतल्याने ठेवीदार झाले हवालदिल..

अहमदनगर दि.१८ डिसेंबर

अहमदनगर शहरातील 113 वर्ष जुनी असलेली आणि एक लाख पंधरा हजार सभासद असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकचा रिझर्व बँकेने लायसन रद्द करून ही बँक बंद केली आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांचे ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे उंबरे झीजवत आहेत मात्र ठेवी परत मिळत नसल्याने अनेक ठेवीदार आत्महत्या करण्याच्या विचारात आल्याचं ठेवीदारांनी सांगितलेय.

अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यामुळे त्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. काही ठेवीदारांच्या घरातील मुलांचे लग्न, कौटुंबिक समस्या, आजारपण यासाठी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या मात्र नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज घोटाळा यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले आणि अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.काही जणांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि परदेशात नोकरीसाठी पैसे लागतील म्हणून ठेवी ठेवल्या होत्या मात्र त्या मुलांचे स्वप्न आणि आयुष्य उध्वस्त झाल्याच्या भावाना ठेविदारांनी यावेळी बोलून दाखवल्या आहेत.

घोटाळा करून बँक बंद करून चोर संचालक मंडळ सध्या आयुष्य आरामात जगत आहेतमात्र सर्वसामान्य ठेवीदार स्वतःने कष्ट करून कष्ट करून मिळवलेल्या स्वतःच्या पैशासाठी बँकेच्या खेट्या घालत आहेत मात्र याबद्दल संचालक मंडळाला काहीही घेणे देणे नसल्याचं ठेवीदारांनी यावेळी सांगितले ज्या प्रमाणे आमच्या मुलांना आणि आमच्या कुटुंबाला या संचाळकांमुळे त्रास झाला असा त्रास त्यांच्याही जीवनात आला तर काय होईल याचा विचार करून आमची तळतळ न घेता आमच्या ठेवी परत करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी ही यावेळी ठेविदारांनी केली आहे.

नगर अर्बन बँकेत जवळपास 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने रिझर्व बँकेने कारवाई केली आहे. तर 820 कोटी रुपयांचे कर्ज घेणे बाकी असून असून देवीदारांच्या 320 कोटी रुपये देणे बाकी आहे.

सर्वात जुनी बँक असल्यामुळे अनेक ठेवीदारांनी या बँकेत आपल्या जीवनाची पुंजी ठेवी म्हणून ठेवली होती मात्र संचालकांनी केलेल्या घोटाळ्यामुळे बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडले आहेत त्यामुळे ठेविदार बँकेमध्ये अनेक चकार मारूनही ठेवी मिळत नसल्याने अहवाल दिल झाले आहेत आता आमच्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचाही सांगत असून अनेकांना ठेवी न मिळाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version