अहमदनगर दि. १३ –
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव विभाजन विभिषिक स्मृती दिवस निमित्त अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरीक प्रा. श्री. मधुसूदन मुळे यांच्या हस्ते, . महापौर . रोहिणी संजय शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व . उपमहापौर . , महिला बालकल्याण समिती मा. सभापती सौ. पुष्पाताई बोरुडे,.नगरसेवक गणेश कवडे,.श्याम नळकांडे, .अतिरिक्त आयुक्त डॉ. . प्रदीप पठारे, मा. उपायुक्त . सचिन बांगर, . सहाय्यक आयुक्त . सचिन राऊत, नगरसचिव . एस.बी.तडवी, जल अभियंता . परिमल निकम, सहा. आयुक्त . ए. डी. साबळे, सिस्टीम मॅनेजर . ए. डी. साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद रोडवरील मनपाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाले.
यावेळी जेष्ठ नागरीक प्रा. श्री. मधुसूदन मुळे यांनी भारत देशाचे स्वातंत्र्य, क्रांतीकारकांचे बलिदान याबाबत माहिती दिली. देशाची झालेली फाळणी व त्यात घडलेल्या घटना या कटु आहेत. यात लाखो नागरिक विस्थापीत झाले तर काहींना आपला जीव गमवावा लागला. या सर्वांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मृती मनात आहेत. यानिमित्त दि. १४ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांनी पहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. तसेच प्रदर्शनाच्या उद्देशाबद्दल प्र. प्रसिध्दी अधिकारी श्री. शशिकांत नजान यांनी थोडक्यात परिचय करुन दिला. कार्यक्रमात ” झंडा ऊंचा रहे हमारा ” हे ध्वजगीत तसेच ” ए मेरे वतन के लोगो ” हे गीत वाजविण्यात आले. तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.