अहमदनगर प्रतिनिधी –
प्रभाग क्रमांक ९ (क) मधून महाविकास आघाडी च्या वतीने सुरेश तिवारी यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून महाविकास आघाडी चा अर्ज भरताना काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नसल्याने आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं समोर आले आहे. भाजप कडून मागील निवडणुकीमध्ये प्रदीप भैय्या परदेशी यांनी निवडणूक लढवली होती. परदेशी यांना मागील निवडणुकीत २५६१ मते मिळाली होती. प्रदीप भैय्या परदेशी यांनी पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून भाजपतर्फे आपला अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार याचे चित्र स्पष्ट होईल.मात्र खरे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार असून सध्या तरी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.