अहमदनगर( शिर्डी) ८ मार्च
– वंचित बहुजन आघाडीचा तीन दिवसीय मेळावा शिर्डी येथे सुरू आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर आज शिर्डी येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यांना अजून महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची आहे. म्हणून त्यांचा नगरपालिका, महापालिकेंवर डोळा आहे. संधी त्यांना मिळाली. प्रशासका मार्फत आपल्याला लुटता येते. म्हणून त्यांनी लुटारूचे कामकाज सुरू केले आहे. हा प्रयोग देशाच्या एकतेला हाणीकारक ठरू शकतो. निवडणुका म्हणजे पाच वर्षांनी नवीन लोक निवडून देण्याची संधी तुम्ही गमावता आहात. साचलेपणा आला की त्याच्यामध्ये किडे पडायला सुरवात होते.
देशातील विविध राज्याच्या निवडणुका, राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार घेणे, ओबीसी आरक्षण या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व महाविकास आगाडीवर जोरदार टीका केली. मराठ्यांचा आरक्षणाचे वाटोळ या आघाडी सरकारने केल आहे आता ते ओबीसी आरक्षणाचे वाटोळ करणार आहेत त्यामुळे यांच्या भूलथापांना बळी न पडता ओबीसी आरक्षण विषयी वेगळी भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी ओबीसी नेत्यांना केल आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, घटनेची पायमल्ली करण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहेत. ही राज्यघटना काँग्रेसच्या कालावधीत निर्माण झाली. आज दुर्दैवाने हीच काँग्रेस घटनेची पायमल्ली करत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या इतिहासाची व वारश्याची लाज असेल तर ते घटनेची पायमल्ली करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने बरोबर राहणार नाहीत.