श्रीगोंदा दि.१३ फेब्रुवारी
श्रीगोंदा वरून काष्टी ला सोडवायला निघालेल्या तीन मित्रांचे अपघाती निधन झाले आहे यामुळे श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. श्रीगोंदा येथील राहुल आळेकर आणि आकाश खेतमाळीस हे केशव सायकर याला काष्टी येथे सोडवण्यासाठी मित्राची स्विफ्ट कार घेऊन निघाले होते रविवार रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रोडवर हॉटेल अनन्या जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला.
अपघात घडल्यानंतर हॉटेल अनन्या चे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत गाडीतील जखमींना ऍम्ब्युलन्समध्ये टाकून तातडीने दवाखान्यात उपचारासाठी रवाना केले होते. मात्र या भीषण अपघातत राहुल सुरेश आळेकर वय २२,केशव सायकर वय २२,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय१८ या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे.
उसाच्या ट्रॉलीला मागून धडकून अनेक वेळा अपघात होतात मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही कारण आजही अनेक ट्रॉल्या विना रिफ्लेक्टर अथवा कोणतेही रेडियम न लावता रस्त्यावरून जात असल्यामुळे अनेक वेळा रात्री अंधारात या ट्रॅक्टर ट्रॉली दिसत नसल्यामुळे अपघातात अनेक लोकांचा जीव गेला आहे याकडे आरटीओने लक्ष देणे गरजेचे आहे.