Home जिल्हा कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस दलाचे कामच – पोलीस निरीक्षक ...

कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस दलाचे कामच – पोलीस निरीक्षक रामराव ढिकले

श्रीगोंदा दि २० फेब्रुवारी
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बेलवंडी कोठार येथे चालू आहे. या श्रम संस्कार शिबिरात ‘कायदा आणि सुव्यवस्था’ या विषयावर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की कायदा हा सर्वांसाठी असतो त्यानुसार सुव्यवस्था निर्माण करणे हे पोलीस खात्याचे काम असते. विविध घटना घडतात त्या घटनेवर नियंत्रण आणणे हे पोलिस दलाचे कामच आहे. धार्मिक भावना भडकवणे, मंदिर विटंबना विद्यार्थी आंदोलने, व्यापारी आंदोलने, दररोजचे मोर्चे यावरती पोलीस खात्याला नियंत्रण ठेवावे लागते ते करत असताना समोर आपलेच लोक आहे हे विचारात घेऊन त्याची योग्य पद्धतीने हाताळणे करावे लागते. हे करत असताना शासकीय धोरणानुसार वेळोवेळी वरिष्ठांचे आदेश लक्षात घेऊन काम करावे लागते. परंतु सुव्यवस्था निर्माण करणे हे त्या त्या पोलिस स्टेशनचे काम असते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कोठारी, किरण काळे, पोलीस पाटील घोडे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डिकले साहेब पुढे म्हणाले की, काही आंदोलने प्रतीकात्मक असतात रस्ते अडवून ते आंदोलने केली जातात परंतु रस्ते हे सामान्यांसाठी व श्रीमंतांसाठी असतात. काही वेळेस शासकीय अधिकारी, आजारी रुग्ण, भाजीपाला, परीक्षार्थी विद्यार्थी त्यांचा येण्या-जाण्याचा तो मार्ग असतो. रस्ते अडवले तर त्यांचे अडवणूक तसेच नुकसानही होते. म्हणून आम्हाला त्या आंदोलकांशी चर्चा करून रस्ते कसे मोकळे होतील हे पहावे लागते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते. नागरिकांच्या सहभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्यास फार मोठी मदत होते. एखाद्या छोट्या घटनेवरून मोठी घटना घडते तेव्हा पोलीस खात्याचा तो कसोटीचा काळ असतो तरीही प्राप्त परिस्थितीत योग्य मार्ग काढावा लागतो. तेव्हा वरिष्ठ आपले कौतुक करतात आणि आपल्याला काम करण्याची बळ मिळते.
पोलिस दलात काम करताना आपले रेकॉर्डही चांगले असले पाहिजे. त्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्याला योग्य ते सहकार्य करतात. अलीकडच्या काळात इस्राईल सारखी गतिमान पोलीस यंत्रणा आपल्याकडेही निर्माण झालेले आहे. त्यामुळे गुन्ह्याचा लवकर छडा लागतो. पोलीस हे लोकांचे मित्रच असतात असे ते शेवटी म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली सनदी अधिकारी होऊन समाजाची चांगली सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते. स्पर्धा परीक्षा या विषयावर बोलताना ते म्हणाले की कठोर परिश्रम केले तर यश मिळतेच म्हणून कठोर परिश्रम करा.

याप्रसंगी एनएसएस चे प्रमुख प्रा.रमेश थोरात, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुदाम भुजबळ, प्रा. देवेंद्र बहिरम प्रा. श्रीमती वारे मॅडम, श्रीमती जाधव मॅडम याप्रसंगी उपस्थित होते. शेवटी आभार आभार प्रदर्शन महाविद्यालयाची विद्यार्थिनी गवळी हिने मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version