अहमदनगर दि २० मार्च – (सुशील थोरात)
“धरती पे लड़ी तूने, अजब ढंग की लड़ाई
दागी न कहीं तोप, ना बन्दूक चलाई
दुश्मन के किले पर भी, ना की तूने चढ़ाई
वाह रे फ़कीर खूब करामात दिखाई
चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी…”
या भजनाच्या ओळी नुसार ताबा माफिया गुंडांना आपल्याला हाकलून लावावे लागेल करण हा त्रास कोण्या एकट्या माणसाला होत नाही तर मध्यमवर्गीय नागरिकांसह अनेक धनदांडग्या लोकांना होत आहे.
अनेक व्यापारी, व्यावसायिक ,डॉक्टर,किंवा गुंतवणूकदार जमिनी मध्ये पैसे लावत असतात त्यांना सुद्धा या ताबा माफियांच्या गुंडांमुळें त्रास झालेला आहे.असे नाही की ठरविक लोकांना याचा त्रास होतो तर समाजातील सर्वच स्थारतील नागरिकांना यांचा त्रास आहे एवढे नव्हे तर राजकारणातील स्वच्छ आणि सरळमार्गी जनतेच्या सेवकांना या ताबा माफियांमुळे डोकेदुखी वाढलीय.
आजकाल जागेच्या व्यवहारात एक शब्द प्रचलित झालाय लेटीकेशन करण कोणतीही मोकळी जागा विकण्यास निघाली तर घेणाऱ्याचा पहिला प्रश्न असतो कोणाचे लेटीकेशन नाही ना ? कागदपत्री ही जागा कितीही बिनधोक असली तरी काही लोकांच्या एका चक्कर मुळे ती जागा लिटिकेशन मध्ये परावर्तित होते ताबा मारणाऱ्या टोळ्यांमधील काही लोक अशा मोकळ्या जागांवर खुर्च्या टाकून बसले की झाल लेटीकेशन आणि मग ती जागा संबंधित मालकाला विकण्यास मोठी अडचण निर्माण होते.
एवढेच नव्हे तर एखाद्या ठिकणी काम सुरू झाले तर इमारती साठी पाया टाकण्याचे काम सुरू असताना पाया साठी खणण्यात आलेल्या खड्ड्या मधून निघालेला मुरूम बळजबरीने घेऊन जाणारे टोळके सुद्धा कार्यरत असून मुरूम दिला नाही तर दमदाटी करायला किंवा बळजबरीने उचलून नेला हे टोळके मागेपुढे पाहत नाही.
लेटीकेशन,ताबा, टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्यामुळे सामन्य नागरकरसह याचा त्रास सर्वांनाच होतोय पण शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात या म्हणी प्रमाणे कोणीच पुढे येत नाही किंवा या ताबा माफियांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
आपला भारत देश,महराष्ट्रा असेल स्वतंत्र झाला तो मोठ्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा देशासाठी प्राण देणारे हुतात्मे असतील यांच्या रक्तातून हा देश आणि हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता आहे ती याच आपल्या मातीमधील ताबा गुंडांना नामशेष करण्याची.
पुण्यामधील एका व्यक्तीच्या मोकळा प्लॉट वर असाच ताबा मारण्याचा प्रकार झाला होता त्याने सर्व बाजूने प्रयत्न करून अखेर थकल्यानंतर गांधीगिरी करत ताबा माफियांना चांगलाच धडा शिकवला होता, आपल्या मोकळ्या प्लॉटच्या बाहेर त्याने आपल्या कागदपत्रांच्या सर्व प्रतींचे फ्लेक्स बोर्ड तयार करून प्लॉटच्या अवती-भवती लावले तसेच ज्या सरकारी कार्यालयात केलेल्या तक्रारी त्या सर्वांचे भले मोठे बॅनर लावून मला न्याय मिळेल का ? माझ्या कष्टाच्या स्वमलकीच्या जागेवर या गुंडांनी बळजबरी ताबा घेतला आहे अशा आशयाचे बोर्ड लावल्यानंतर काही तासातच ताबा माफिया गुंडांनी तिथून पळ काढला होता त्यामुळे बिना लाठी बिना खडग स्वतंत्र कसे मिळते याचं उदाहरण पुण्यातील त्या व्यक्तीने समाजासमोर ठेवले आहे.
त्यामुळे असे कोणी ताबा माफियाने लिटिकेशन ताबा मारला असेल तर त्याबाबत त्या गुंडांचं नाव जाहीर होणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनही खडबडून जागे होते आणि मग सर्व कारवाईचे सोपस्कर पार पडते त्यासाठी सर्वांनी आता जागृत होणे गरजेचे आहे अन्यथा कष्टाने कमावलेली लाखो रुपयांची मालमत्ता भामट्या ताबा माफियांच्या घशात घालण्या पलीकडे कोणताही पर्याय उरणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश असताना असाच प्रकार एका सर्वसामान्य व्यापाऱ्या यबरोबर घडला होता त्याने पाईपलाईन रोड भागातील काही राजकीय वलय असणाऱ्या लोकांकडून जमीन खरेदी केली होती सौदा ठरल्या प्रमाणे ठरविक रक्कम दिल्यानंतर जमीन नावावर होईल असा व्यवहार झाला होता मात्र करोडो रुपयांची रक्कम घेतल्यानंतर त्या व्यापाऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ सुरुवात केली त्याच वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कृष्णप्रकाश यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात झाली त्या व्यापाऱ्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत कृष्णप्रकाश यांच्याकडे जाऊन तक्रार केली आणि काही तासातच कृष्ण प्रकाश यांनी त्या राजकीय वरदहस्त असणाऱ्या टोळक्याला असा दणका दिला की दोन तासात व्यापाऱ्याची रक्कम त्याला परत मिळाली होती. त्या खादीधारकांना कृष्णप्रकाश यांनी चांगला धडा शिकवला होता अंगात खादीचे कपडे गळ्यात भल्यामोठ्या सोन्याच्या चैन आणि आलिशान मोटारीत आलेल्या त्या टोळक्याला अक्षरशः दोन पायांवर बसवून त्यांची झाड झडती घेतली होती. त्यांच्यामागे एका मोठ्या नेत्याचा हात होता त्याचं नावही या प्रकरणात घेणार असल्याचं समजताच त्यानेही या टोळक्याला काही करा पण ते प्रकरण मिटवा पण माझं नाव घेऊ नका देऊ असं सांगितलं होतं मात्र खमक्या अधिकारी असल्यामुळे कृष्णप्रकाश यांच्या काळात अनेक ताबा माफिया शांत झाले होते मात्र आता पुन्हा हे ताबा माफिया नगर शहरात हौदोस घालत असून यांना कोणताही लगाम राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात मुळशी पॅटर्न प्रमाणे नगर ताबा पॅटर्न होऊन हिंसा होऊ नये एवढीच अपेक्षा.
वाचत राहा..
ताबा माफियांचा त्रास फक्त सर्वसामान्य माणसाला नाही तर बांधकाम क्षेत्रातील अनेक नामवंत व्यावसायिकांना सुद्धा आहे. पांढरपेशी खादीवाले किंवा काही राजकीय पदाधिकारी या व्यावसायिकांकडून एका सदनिकेत मागे किंवा एका फ्लॅट मागे कसे पैसे कमावतात वाचा पुढील भागात