Home जिल्हा दोन वर्षा नंतर श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेत दिसला उत्साह काल्याची दहीहंडी फोडून,...

दोन वर्षा नंतर श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेत दिसला उत्साह काल्याची दहीहंडी फोडून, रेवड्यांची उधळण

नेवासा -दि२२फेब  प्रतिनिधी आदित्य सुकाळकर

बोल मोहिनीराज की जयचा जयघोष, रेवड्याची उधळण करत ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्यदिवशी सायंकाळी काल्याची दहीहंडी मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात व देशपांडे गल्ली मध्ये ठिक-ठिकाणी काल्याचे वाटप करण्यात आले. यात्रा उत्सव काळात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर मोठ्या उत्साहात होत असलेल्या यात्रेचा आज महत्त्वाचा काल्याचा दिवस होता आज पहाटे वडार समाज बांधवांच्या वतीने प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीचे नगर पंचायत चौकामध्ये आल्यानंतर आबा मुळे व सौ मुळे यांनी पंचारती ओवाळून स्वागत केले. उत्सवमूर्तीस आणलेल्या गंगाजलाने जलाभिषेक घालण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते उत्सवमूर्तीची पूजा करण्यात आली.दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला.

सायंकाळी न्यायालयाच्या इमारतीमध्ये ठेवलेल्या पालखीचे पूजन, न्यायाधीश ए.ए.पाचारणे, बालाजी चौधरी, यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर जय घोष यामध्ये पाकशाळा येथून उत्सवमूर्तीचे मंदिराकडे प्रस्थान झाले.यावेळी प्रवरासंगमच्या वाद्यवृंद व भजनी मंडळाच्या टाळमृदुंगाचासह सनई चौघडयाचा निनादात व मोहिनीराज महाराज कि जयचा जयघोष करत उत्सव मूर्तीचे कोर्ट गल्ली,देशपांडे गल्ली मार्गावर भाविकांनी दर्शन घेतले. पालखी मार्गावर ठिक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

उत्सवमूर्ती मंदिरात गेल्या नंतर मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी पालखीवर भाविकांनी रेवड्यांची उधळण केली. मोहिनीराजांचा जयजयकार काल्याप्रसंगी मंदिर परिसरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीमधून घुमत होता. देशपांडे कुटुंबीयांतर्फे मंदिर परिसरात नागरिकांच्या वतीने काल्याचे वाटप करण्यात आले.मागील दोन वर्षात कोरूना साथीच्या रोगांमुळे यात्रा महोत्सव सावट होते मात्र यावर्षी शहरातील रस्ते गर्दी फुलून गेले होते.मुख्यपेठेसह रस्त्यांवर मिठाई, सौंदर्यप्रसाधने, मिठाई,

गृहपयोगी,खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती.तरूण व बालकांचे आकर्षण असणारी रहाट पाळणे मोठ्या संख्येने दाखल झालेली होते. रात्री चंद्रोदया बरोबर पुन्हा एकदा पालखीतून देव ग्राम प्रदक्षणा करण्यासाठी निघाले मुख्य बाजारपेठेतून प्रत्येक दुकानदार व घरासमोर औक्षण करण्यात आले रात्री नेहमीप्रमाणे मारुती मंदिर चौकामध्ये भव्य रांगोळी काढण्यात आली होती व मोठ्या प्रमाणावर रोशनाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version