अहमदनगर दि.१२ एप्रिल
ठाकरे सरकारचा कारभार हिंदू विरोधी सरकार असून दोन समाजात वाद व्हावा यासाठी ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे देशात भजाप नव्हे तर ठाकरे सरकार जातीय व्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
अहमदनगर मध्ये रामनवमीला पाकिस्तान जिंदबादचे नारे नगर शहारात लागले जात असतील तर हे सरकार काय करतेय असा सवाल त्यांनी केला
ठाकरे सरकारने हिंदुत्व सोडले असून मुख्यमंत्री घरकोंबडे आहेत त्यामुळे त्यानं राज्यात काय चाललंय माहीत नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये हिंदू भगिणीला मुस्लिम मुलाने पळवून नेले आहे तीन महिने झाले तरी अद्याप त्या मुलीचा तपास नाही या बाबत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटून लवकर तपास करावा अन्यथा भाजप समर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर शहरात लागलेल्या पाकिस्तान जिंदाबाद च्या नारेबाजीचा व्हिडीओ पोलीस अधीक्षकांना दिला असून त्याचा तपास करू असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी आमदार राणे यांना दिलंय