अहमदनगर दि.७, एप्रिल
अहमदनगर शहरातील मुख्यबाजार पेठेतील रस्त्यावर हातगाडी लावून बसणारे विक्रते आणि व्यावसायिक यांचा वाद थांबायला तयार नाही.
कापडबाजारातील अतिक्रमण म्हणजेच दुकानासमोर बसणारे हातगाडी लावून व्यावसायिक हटावन्या साठी कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी उपोषण केले होते त्यानंतर महानगरपालिकेने कापड बाजार मधील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई केली होती तर काही विक्रेते अद्यापही त्या ठिकाणी आलेलेच नाहीत मात्र दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेत सुमारे ४० ते ५० पथविक्रेत्यांनी बाजार पेठेतील काही व्यापाऱ्यांचे आपल्या दुकानासमोर बसण्यात हरकत नसल्याचे दाखले महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना आणून दिले आहेत. मात्र या ना हरकत दाखला यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे महानगरपालिकेने अद्यापही कोणता निर्णय घेतला नाही.
या नाहरकत दाखल्यांना प्रत्युत्तर म्हणून आता काही व्यापाऱ्यांनी हरकत पत्र / तक्रार अर्जाचे हत्यार उपसले असून आपल्या दुकानासमोर सार्वजनिक वापराच्या रस्त्यांचा दुरुपयोग करून हातगाडी व पथारी लावून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार अर्ज महापालिकेला देण्याची तयारी सुरू केली आहे. एका छापील अर्जावर फक्त व्यपऱ्याचे दुकानाचे नाव पत्ता टाकून हरकत अर्ज महानगरपालिकेला देण्याची तयारी सध्या सुरू आहे.
या ना हरकत आणि हरकत तक्रारी अर्जा मुळे महापालिका प्रशासनाची डोके दुखी मात्र वाढणार हे नक्की.