Home शहर महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत दिवसभर पाण्याचा खडखडाट

महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत दिवसभर पाण्याचा खडखडाट

अहमदनगर दि.७ एप्रिल
अहमदनगर शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला असून महापालिकेवर मागील दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस, भजाप, मनसे , शिवसेनेने आयुक्तांना पाणी प्रश्नावर जाब विचारला मात्र पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजना मुळे आणि विजवीतरणच्या लाईट जाण्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतोय.

शहरातील बराचसा भाग तहानलेला असताना आज महापालिकेच्या मुख्य इमारती मध्ये पाण्याचा खडखडाट होता मुख्य इमारती मधील टाकीतील पाणी संपल्याने आज कर्मचाऱ्यांना याची झळ पोहचली मनपा कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचे दोन्ही स्रोत बंद होते.

दुपारी उशिरा पाण्याचा टॅंकर महापालिकेत आला मात्र तो पर्यंत कर्मचाऱ्यांनी घरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या संपल्या होत्या त्या मुळे थेट औरंगाबाद रोड वरून कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ आली होती.

नगर शहरात पाण्याचा खडखडाट असताना महापालिका कार्यालयातही पाण्याचा खडखडाट झाल्याने हा एक चर्चेचा विषय झाला होता .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version