Home क्राईम पीरशहा खुंट येथे किरकोळ कारणातून तणावपूर्ण वातावरण पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ...

पीरशहा खुंट येथे किरकोळ कारणातून तणावपूर्ण वातावरण पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला

अहमदनगर दि.3
अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे केशकर्तनालयाच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून आज मोठे भांडण पोलिसांच्या सातर्कतेने वाचले कोतवाली  पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी या ठिकाणी असलेल्या एका केशकर्तनालय च्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली झाल्याची माहिती मिळतेय.या बाचाबाचीचे पर्यवसान आणि अफवे मुळे आज मोठ्या भांडनात झाले असते दोन्ही बाजूंनी तरुणांचा मोठा जमाव जमल्याने या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण झाले होते.मात्र या घटनेची खबर कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना कळताच यांनी तातडीने येथे धाव घेत सर्व जमावाला पांगवले याठिकाणी एक गाडी फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही सध्या परिस्थिती शांत असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version