अहमदनगर दि.२०मार्च
अहमदनगर शहारत दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे त्यामुळे रोजच वाहतुकीचा खोळंबा तर होतच असतो त्या बरोबर गाडी लावन्यवरून वाद विवाद नित्याचे झाले आहेत.
अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे सायंकाळी सहानंतर विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या सायंकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत उभ्या असतात या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अनेक नागरिक रोजच येतात मात्र जेव्हा हे नागरिक या गाड्यांवर येत असतात तेव्हा त्यांना वाहने लावण्यास जागा नसल्याने ही चारचाकी दुचाकी वाहने रोडवरचा उभी करून नागरिक खाद्यपदार्थांच्या गाड्या वर जातात प्रोफेसर कॉलनी चौक हे मध्यवर्ती ठिकाणी झाले असून या चौकात नगर शहर आणि उपनगर हे जोडले जात असल्यामुळे या चौकातून प्रचंड वाहतूक असते.
विशेष म्हणजे या चौकाच्या हाकेच्या अंतरावर तोफखाना पोलीस स्टेशन आहे या तोफखाना पोलीस स्टेशन ची बेकर गाडी अनेक वेळा या चौकात रस्त्या मध्ये लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीत अडकलेली दिसते.
या चौकातून होत असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर आडव्या लावल्या चार चाकी गाड्या मुळे प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक कडे जाणाऱ्या रोडवर आणि प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रोडवर संध्याकाळी रोजच वाहतुकीचा खोळंबा होतो.
या ठिकाणी जे नागरिक खाद्यपदार्थांच्या गाड्या लावतात त्या थेट रोडच्या कडेला असल्याने आलेले गिऱ्हाईक थेट रस्त्यावर गाडी लावतात आणि चारचाकी गाडीत बसून पदार्थांवर ताव मारतात आणि उरलासुरला रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो त्यामुळे या ठिकाणी रोडवर लावणाऱ्या वाहनांमुळे वादाचा प्रसंग रोजच उदभवत असतो.
शनिवारी सायंकाळी चारचाकी गाड्या रोडवर उभ्या असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता एका महिलेला यावेळी शिवीगाळ करण्यात आली होती त्यामुळे काही वेळ या ठिकाणी ट्राफिक जाम झाली होती. भविष्यात या रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात घडू शकतो त्यामुळे येथे रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या चार चाकी गाड्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यामध्ये आडव्या लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरात राहणारे आणि या रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक करीत आहेत