अहमदनगर ९ फेब्रुवारी-
अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करून लोकअर्पन सोहळा पार पडला मात्र हा सोहळा पार पडत असताना झालेलं राजकारण पाहता सर्वच राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात असं दिसून येतं.
नेमका कार्यक्रम कोणाचा होता याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे कार्यक्रमा आधी महिनाभर शहरामध्ये ठीक ठिकाणी जाहिरातबाजी करण्यात आली होती. या जाहिरातींमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव अथवा सौजन्य नव्हते संपूर्ण हिंदू समाज या मथळ्याखाली या कार्यक्रमाचे नियोजन होत असल्याचे नागरिकांना भासवण्यात आलं होतं. मात्र वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिके मधून निधी देण्यात आला होता हे आता उघड झाला आहे. महानगरपालिकेने निधी दिला असताना हा कार्यक्रम सरकारी होणे गरजेचे होते मात्र या कार्यक्रमाला महानगरपालिकेचा एकही अधिकारी दिसून आला नाही.
अहमदनगर शहराच्या प्रथम नागरीक महापौर रोहिणी शेंडगे या कार्यक्रमाला पोहोचल्या खऱ्या मात्र त्यांना सुमारे एक तास ताटकळत उभे राहावे लागले अखेर महापौरांसह शिवसेनेचा एक गट पुन्हा मागे परतला होता तर शिवसेनेचे काही नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित होते. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेचे दोन मतप्रवाह या कार्यक्रमाबाबत दिसून आले.
हा कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केला होता सोशल मीडियावर शिवसैनिकांनी या कार्यक्रमाबाबत अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिल्या मात्र युवा सेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड वगळता शिवसेनेच्या एकही पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबाबत अद्यापही भाष्य केले नाही हे विशेष.
या कार्यक्रमाच्या भाषणात आमदार संग्राम जगताप यांनी या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची नावं घेतली असल्याचा व्हिडीओ सध्या राष्ट्रवादीतर्फे व्हायरल करण्यात येत आहे तर उशिरा का होईना भाजपच्या एका गटाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला आहे तर शहर काँग्रेसने या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादीने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत माफी मागावी अशी मागणी केली आहे.
सध्या महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना महापौर पदी विराजमान झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महापौरांसह काही नगरसेवकांची मोठी गोची झाल्याचं दिसून येत आहे. कार्यक्रम महापालिकेचा पोस्टर राष्ट्रवादीचे आमदारांचे आणि ताटकळत बसावं लागलं महापौरांना तरीही हा सर्व प्रकार घडूनही गप्प बसण्यापलिकडे शिवसेनेच्या नगरसेवकांचा हातात काहीच राहिलेले नाही.
युवा सेना आक्रमक झाली असली तरी त्यांच्या पाठीशी सध्या तरी कोणी उभा राहिल्याचे चित्र नगर शहरात दिसून येतय यातून मात्र एक गोष्ट लक्षात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकारण करण्या पुरताच हे राजकारणी करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. भाजपने आरोप करत असताना सांगितले की स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावेळी मूर्तीचे नूतनीकरण करण्यात आले होते इतक्या वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरामध्ये आहे आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत अनेक वेळा महापालिकेत सत्ता उपभोगली आहे त्यामुळे त्यांनी याबाबत कधी विचार का केला नाही आता राजकारण करण्यासाठी समस्त हिंदू समाजाचं नाव घेत राष्ट्रवादीने रडीचा डाव खेळ असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.
शहराच्या विविध स्तरातूनही या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण केले याबाबत नव्हे तर या ठिकाणी लावलेल्या जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यामुळे हा कार्यक्रम चांगलाच वादात सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली तरुणाई ही चुम्मा चुम्मा च्या गाण्यावर नाचत असेल तर या देशाचं भविष्य काय असाच प्रश्न समोर येतोय. काही कार्यकर्त्यांच्या मते हे गाणे डीजे चालका कडून चुकून लागले होते असे सांगण्यात येतंय मात्र हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण होत असताना आणि त्याच दिवशी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला असताना हा कार्यक्रम साधेपणाने साजरा होणे गरजेचे होते आणि त्याच प्रकरचे गाणे लावणे गरजेचे असताना एक नव्हे तर चार पाच हिडीस गाणे चुकून कसे लागू शकतात हा प्रश्नच आहे.
तरुणाई कोणाचाही ऐकत नसते असं बोललं जातं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जुम्मा जुम्मा लावून त्यावर नाचणे अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी गोष्ट असल्यामुळे नक्कीच त्याचा निषेध करणे तेवढ कमी आहे. मात्र कार्यक्रम होऊन दोन दिवस झाले सर्वच पक्षांनी याबाबत निषेध केला आपापल्या पद्धतीने राजकारण सुरू आहे आता याच प्रमाणे गणपती उत्सव मध्ये सुद्धा गणपतीसमोर अशाच रिमिक्स गाणे लावून आणि विचित्र अंगवारे करून जो नाच होत असतो तो बंद करणे ही यापुढे आता या राजकीय पक्षांनी ध्येय ठेवावे असंच यानिमित्ताने सांगणे आहे.
देशातील राज्यातील आज पर्यंत जेवढे महामानव होऊन गेले आहे त्यांनी कधीही अशा नाचाचं समर्थन केले नाही तसेच कोणत्याही देवदेवतांनी अशाप्रकारे नाच करावा असं इतिहासात लिहलं नाही त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी इथून पुढे येणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमा मध्ये तो पारंपारिक पद्धतीने कसा साजरा होईल याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की सर्व नेते आज ना उद्या एकाच व्यासपीठावर येतील आणि ते अंधारात एकत्र असतात मात्र सोशल मीडियावर कार्यकर्ते मात्र अत्यंत जोशाने भांडतात आणि कायमस्वरूपीची दुश्मनी घेऊन बसतात.नेते हे फक्त बोलण्यापुरते असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम राखून सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करावी अत्यंत टोकाला जाऊन टीका करून काही उपयोग नाही कारण या कार्यक्रमानंतर एकाही मोठ्या राजकीय नेत्याने ब्र सुद्धा काढला नसताना कार्यकर्ते मात्र अत्यंत जोषाने आणि त्वेषाने सोशल मीडियावर भांडणात करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामध्ये फक्त कार्यकर्त्यांचे नुकसान आहे नेते उद्या पुन्हा एकदा गळाभेट घेतील आणि तुम्ही मात्र कायमचे मित्रांपासून दूर होतात त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यावरच राजकारणात थांबवा आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टोकाचे भांडणे थांबवा कारण पुढील कार्यक्रमात आजचे एकमेकांवर टीका करणारे राजकीय कार्यकर्ते पुन्हा एका व्यासपीठावर दिसले तर तुम्ही फक्त हात चोळत बसणार आणि मनात खंत राहणार आपण यांच्या मुळे चांगल्या मित्रापासून दूर झालोय.