Home राजकारण महाराष्ट्रातील महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली उपमुख्यमंत्री...

महाराष्ट्रातील महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रार मोदी मोदी विरुद्ध दादा दादांच्या घोषणांनी कार्यक्रमात अली रंगत

पुणे – दि ६ मार्च
महाराष्ट्रात जेव्हा पासून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासून महाराष्ट्राचे राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा सामना पाहायला मिळाला आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस,शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती.

त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केली.

पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची अलीकडं महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होताय ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाही हे मान्य देखील नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतील रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन केलं महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला सत्यशोधक विचारांचा प्रसार केला या महामानवांच्या उत्तुंग कार्याचा विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र मध्ये पुढे घेऊन जायचा आणि मनात माझ्या बद्दल आकस असूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे हे पण अतिशय नम्रता या ठिकाणी कबूल करतो तसेच माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पुणे शहर आणि शहराच्या विकास कामांबद्दल जी आत्मियता दाखवली त्याबद्दल पंतप्रधान महोदयांना मनापासून धन्यवाद देतो.

या वेळी भगतसिंग कोशीयारी फक्त अजित पवार यांच्याकडे पाहत होते तर पंतप्रधानांनी या बद्दल आपल्या भाषणात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र त्यांनी सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज,महामानव बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्यासह पुण्यातील स्वतंत्र सैनिकांची नावे घेऊन भाषणाला सुरुवात केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण संपत असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दादा दादा च्या घोषणा सुरू केल्या होत्या

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version