Home विशेष सोशल मीडियावरील खोटे संदेश खात्री न करताच पुढे पाठवल्या मुळे होतोय मनस्ताप

सोशल मीडियावरील खोटे संदेश खात्री न करताच पुढे पाठवल्या मुळे होतोय मनस्ताप

अहमदनगर दि.११ जानेवारी
सोशल मीडिया आणि माणसाचं एक घट्ट नातं निर्माण झाल आहे. त्यामुळे आता माणसावर नाही मात्र सोशल मीडियावर माणूस जास्त विश्वास ठेवत असल्याचं दिसून येत याच विश्वासाला कधीकधी तडा जातो.

सोशल मीडियामुळे अनेकांना त्याचा फायदाही झाला आहे. सोशल मीडियामुळे एखाद्याला जीवदान मिळाले आहे.रक्तदान असेल किंवा आर्थिक मदत असेल काही समस्या असतील किंवा अलीकडच्या काळात कोरोना बाबतची माहिती आणि रुग्णालयातील बेड बाबतची परिस्थिती समजण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग झाला आहे. तेवढाच तोटाही झाला असून सोशल मीडियामुळे माहिती मिळणे जेवढे गतिमान झाली आहे तेवढेच माहिती किती खरी आहे याबाबत अनेकवेळा संशय निर्माण होतो.

सध्या सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेज फिरत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होताना दिसतोय. जेव्हापासून कोविडची साथ सुरू झाली आहे त्या काळापासून अनेक खोट्या मेसेज मुळे नागरिकांना मनस्ताप झाला आहे. याचबरोबर पोलिसांनाही अनेक वेळा अशा खोट्या मेसेज मुळे विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. तर या खोट्या मेसेजचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्याचा मेसेज अनेक सोशल मीडिया ग्रुपवर फिरत आहे मात्र हा मेसेज साफ खोटा असून मेसेज पुढे टाकण्याआधी कोणतीही खात्री न करता मेसेज पुढे पाठवण्याच्या नादात आपण काय मेसेज पुढे टाकतोय याचे भान ठेवणे गरजेचे आहे नाही तर यामुळे एखादी अनर्थ किंवा मोठी घटना घडू शकते.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन असा एका खाजगी वृत्तवाहिनीचा मागील वर्षीचा मेसेजही असाच प्रचंड मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत होता अखेर त्या वृत्तवाहिनीला त्याबाबत खुलासा करावा लागला.

असेच अनेक खोटे मेसेज फिरत असताना आपणही तेवढेच सजग राहणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या हातून चुकीचा संदेश पुढे जाणार नाही याची खात्री करणे प्रत्येक माणसाचे ते कर्तव्य आहे.

मात्र कोणताही मेसेज पुढे फॉरवर्ड करताना तो कितपत खरा आहे याची शहानिशा करूनच पुढे फॉरवर्ड केला तर इतर नागरिकांना मनस्ताप वाचू शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version