अहमदनगर दि.१६ सप्टेंबर
गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात (Law College )नुकताच तृतीय वर्ष सहावा विधी 17 चा निकाल लागला असून यामध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करावा आणि स्केल डाऊन पद्धतीचा वापर न करता सुधारित निकाल लावावा या मागणी करता अभाविपच्या (ABVP ) वतीने अहमदनगर येथील पुणे विद्यापीठ चे उपकेंद्र संचालकांना निवेदन देण्यात आले.
निकाल (result ) लावत असताना स्केल डाउन पद्धतीचा वापर करण्यात अलेला आहे. विद्यार्थी च्या महाविद्यालय चा अंतर्गत दिलेले गुण व विद्यापीठ यातुन जाहिर झालेले गुण यात खुप मोठा तफावत आहे. परीक्षार्थी च्या उत्तर पत्रीकेचे मूल्य मापन चुकीच्या पद्धतिने करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. विद्यापीठाने कोरोना पार्श्वभूमिवर अन्याय होनार नाही, याची हमी दिलेली आहे. तरी आपण वरिल मुद्द्यांचा विचार करुण तत्काल योग्य ती करवाही करावी अन्यथा
पुढील चार दिवसात सर्व तृतीय वर्ष सहावी विधि सत्र यांचा सुधरित निकाल लवकारत लावले नाही तर अभाविप तीव्र स्वरूपाच आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .
या वेळी अभाविप चे नगर जिल्हा विद्यार्थी विस्तारक चेतन पाटील, नगर जिल्हा संयोजक अर्थव पाडळे, अर्पित अंकाराम, गणेश जगदाळे,हर्षल मोटे, विशाल शिंदे, प्रथमेश कोकणे, तेजस गुमास्ते, गौरव तिपुले, प्रतिक अंकाराम, शिवराज अमृत, कुणाल चाबुकस्वार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.