Home शहर तो अधिकारी कोण जो म्हणतो मुकुंदनगर मध्ये भंगार लोक राहतात… नगरसेवक असिफ...

तो अधिकारी कोण जो म्हणतो मुकुंदनगर मध्ये भंगार लोक राहतात… नगरसेवक असिफ सुलतान यांची पाणी प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका

अहमदनगर दि.२५ नोव्हेंबर
अहमदनगर महानगर पालिकेची आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी मुकुंदनगर भागातील पाण्याच्या समस्या बाबत नगरसेवक असिफ सुलतान यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले मुकुंदनगर काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा होतो तर काही भागात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जाती या बाबत सभेत चांगलीच घमासान झाली.

मुकुंद नगर हे भंगार एरिया आहे असे वक्तव्य काही अधिकाऱ्यांनी फोन वर बोलताना केले असल्याचे नगरसेवक असिफ सुलतान यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

मुकुंदनगर मध्ये तातडीने ज्या ठिकाणी सात आठ दिवस पाणी येत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी असिफ सुलतान यांनी केली.

मात्र ही चर्चा सुरू असताना मुकुंदनगर मधील इतर लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून होते तर भाजपचे आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी असिफ सुलतान यांना पाठिंबा दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version