Home राज्य अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे- दि.१७ ऑगस्ट

अहमदनगर पुणे महामार्गावरील भयानक अपघातात पाच जनांचा जागीच मृत्यू झाला आहे . संदर्भात अधिक माहिती अशी की रांजणगाव एमआयडीसी मधील एल जी कंपनी समोर हा अपघात झाला. एक मोठा कंटेनर रस्त्याच्या चुकीच्या बाजूने नगरच्या दिशेने येत होता आणि इको कार नागरवरून पुण्याच्या दिशेने जात होती. कंटेनर आणि इको स्पोर्ट गाडीची समोरा समोर भीषण धडक झाली .

ही धडक इतकी भीषण होती की कंटेनर मध्ये इको कार घुसली होती. रात्री दोन वाजता ही घटना घडली असून यात इको स्पोर्ट वाहनातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हे कुटुंब पनवेलचे असून नागरवरून लग्न सोहळा आटपून पनवेल कडे जात होते गाडीत तीन लहान मुले होते त्या मध्ये 14 आणि 7 आणि 4 वर्षे आशा वयाच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेत कंटेनर चालकाची संपूर्ण चुकी असून चुकीच्या बाजूने त्याने गाडी घातल्याने समोरून येणाऱ्या इकोस्पोर्ट गाडीची धडक झाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते.तर अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version