अहमदनगर दि.२५ जुलै
कायनेटिक चौक परीसरातील प्रभाग क्र.१५ प्रियंका कॉम्प्लेक्स सुखकर्ता कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते व पाणी प्रश्नाबाबत सोमवारी माजी नगर सेवक विजय गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर नागरिकांनी मोर्चा काढला होता.
प्रियंका कॉम्प्लेक्स सुखकर्ता कॉलनी या भागातील रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनिय झाली आहे. नागरीकांना जाणे-येण्यासाठी त्रास होत आहे.गेल्या १० ते १५ वर्षापासून मनपाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही नागरीकांच्या मुलभूत सुविधांकडे संबंधित अधिकारी यांचेपैकी कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. पावसाळ्यात महिलांना, विद्यार्थ्यांना व वरिष्ठ नागरीकांना अत्यंत खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो अनेक वेळा चिखलात घसरून पडल्याने वयोवृद्ध नागरिक कायमचे जायबंदी झाले आहेत.
तसेच या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाणी कमी दाबाने येते आणि एक तासात सर्वच लोकांचे पाणी भरुन होत नाही.त्या मुळे हे दोन्ही प्रश्न सोडवावेत आशा मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या सह माजी नगरसेवक विजय गव्हाळे आणि परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले.
या प्रश्नाबाबत या परिसरातील महिला आणि नागरिकांनी सविस्तर माहिती देऊन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी केली यावर लवकरात लवकर पाणी प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आलेल्या नागरिकांना दिले
तसेच पुढील दिवसात या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील काळात उग्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला