Home शहर अहिल्यानगर जिल्ह्याला कलंक लागलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची घाण काढून टाका… प्रशासनाने कारवाई केली...

अहिल्यानगर जिल्ह्याला कलंक लागलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची घाण काढून टाका… प्रशासनाने कारवाई केली नाही तर मनसे टाकणार हातोडा….

अहिल्यानगर दिनांक 17 फेब्रुवारी

अहिल्यानगर शहराच्या भिंगार परिसरातील आलमगीर भाग हा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या नावाने म्हणजेच आलमगीर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अतिक्रमण करून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या पार्थिवाला शेवटची अंघोळ घातली असे प्रचलित करण्यात आले असून आरामगीर मध्ये कागदपत्रांची हेराफेरी करून अतिक्रमण करण्यात आले आहे या अतिक्रमणावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून या ठिकाणी हातोडा मारला जाईल असा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना नरकयातना देऊन त्यांचा जीव घेतलेल्या क्रूर अश्या औरंग्याचे कोणतेही अवशेष हे कुणाला चांगला विचार देऊ शकणार नाही कारण क्रूरता कधीच प्रेरणादायी असू शकत नाही. उलट या क्रूरतेला आदर्श मानून देशविरोधी कारवाया करताना अनेक औलादींच्या आत्तापर्यंत शासनाने मुसक्या आवळल्या आहेत. नगर जिल्ह्याचा हा कलंक लवकरात लवकर पुसला गेला नाही तर भविष्यात यांचे गंभीर परिणाम पुढे येतील आणि यावा जबाबदार प्रशासन राहील. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून स्वराज्यावर अतिक्रमण करू इच्छित व्यक्तीचे विचार या अशा वेगवेगळ्या थडग्यातून जिवंत ठेवण्याचे काही कारण नाही. आपण तात्काळ याचा बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्र सैनिक तयारीत असून संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक या मोहिमेत सहभागी होतील ते प्रशासनाला परवडणारं नसेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
प्रशासनाने आपली भुमिका येत्या ८ दिवसांत स्पष्ट करावी अन्यथा आमचा हातोडा चालणारच असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version